Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) शिक्षण आरटीई शाळा प्रवेश: पालकांना माहिती असावे असे सर्व काही

आरटीई शाळा प्रवेश: पालकांना माहिती असावे असे सर्व काही

आरटीई शाळा प्रवेश: पालकांना माहिती असावे असे सर्व काही

शिक्षण हा आधुनिक समाजाचा पाया आहे, म्हणूनच प्रत्येक मुलास शिक्षित केले पाहिजे. मुलांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क किंवा शिक्षणाचा अधिकार हा भारतीय संसदेचा कायदा आहे. हा कायदा ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा मूलभूत हक्क बनवितो. भारतीय घटनेतील कायद्याचा हा भाग भारतातील मुलांना अधिक रोजगारक्षम, स्वयंपूर्ण आणि स्वतंत्र होण्यास सक्षम करतो.

शिक्षणाचा अधिकार काय आहे?

शिक्षणाचा हक्क हे एक घटनात्मक विधेयक आहे जे प्रत्येक मुलास औपचारिक शिक्षण मिळेल याची खात्री करते. या कायद्यामुळे मुलांना केवळ शिक्षणाची संधीच मिळत नाही तर मुलांना मोफत गुणवत्तेचे शिक्षणही दिले जाईल याची हमी मिळते. या कायद्यानुसार, ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना विनामूल्य शिक्षणाचा अधिकार आहे.

हा कायदा कधी आणि का अस्तित्वात आला?

हे विधेयक २६ ऑगस्ट २००९ रोजी मंजूर झाले. यावेळी, शिक्षणाला प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क बनविण्यासाठी भारत १३५ देशांपैकी एक बनला. हा कायदा १ एप्रिल २०१० रोजी अंमलात आला.

शिक्षण हक्क कायद्याची मुख्य वैशिष्ट्ये

कोणत्याही पालकांनी औपचारिक शिक्षणाच्या दिशेने हा मार्ग निवडल्याबद्दल आरटीईची वैशिष्ट्ये समजून घेणे आवश्यक आहे. यात आरटीई प्रवेश वयोमर्यादा आणि त्यासह अधिनियमातील कायद्यांची मुख्य वैशिष्ट्ये आणि नियमांची समजूत घालणे समाविष्ट आहे.

  • कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि विनामूल्य आहे.
  • प्रत्येक शाळेत मुले व मुलींसाठी स्वच्छ आणि स्वतंत्र शौचालये असणे आवश्यक आहे.
  • शाळांनी पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध करुन दिले पाहिजे.
  • वर्गातील शिक्षक विद्यार्थ्यांचे गुणोत्तर प्रमाणित केले आहे.
  • मुलांना त्यांच्या वयानुसार एका वर्गात प्रवेश दिला जाणे आवश्यक आहे आणि जर मुले मागे पडली तर त्यांना सहाय्य प्रदान करणे आवश्यक आहे.
  • नियुक्त केलेल्या शिक्षकांनी योग्य प्रशिक्षण दिले आहे याची खात्री या कायद्यात आहे. अधिनियमात शिक्षकांच्या पात्रतेचे निकष व मानके नमूद केली आहेत.
  • कायद्यानुसार मुलांच्या प्रवेशाची हमी आहे.
  • शाळांमध्ये मुलांमध्ये भेदभाव किंवा छळ होणार नाही याची काळजी घेण्यासाठी येथे कडक कायदे व मॉनिटर्स आहेत.
  • पालकांच्या संमतीशिवाय मुलांना थांबवून ठेवता येणार नाही आणि त्यांना हद्दपार करता येणार नाही.
  • खासगी शाळांमधील प्रत्येक वर्गातील २५% विद्यार्थी हे समाजातील वंचित सदस्यांसाठी आरटीई कायद्याचा भाग असणे आवश्यक आहे.

शिक्षण हक्क कायद्याची मुख्य वैशिष्ट्ये

आरटीई कायद्यांतर्गत प्रवेश घेण्याची पात्रता

आरटीई कायद्यांतर्गत प्रवेश मिळण्याच्या पात्रतेविषयी काही माहिती येथे दिली आहे.

  • विद्यार्थ्यांसाठी एलकेजी प्रवेशाचे किमान वय जन्म प्रमाणपत्राद्वारे निश्चित केले जाईल.
  • आरटीई कायद्यानुसार सर्व खासगी शाळांना आर्थिक दुर्बल घटकांमधून आलेल्या २५% जागा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • ज्या कुटुंबाची कमाई रु. .५ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे ते आरटीई कायद्यांतर्गत जागांसाठी अर्ज करु शकतात.
  • अनाथ, विशेष गरजा असणारी मुले, स्थलांतरित कामगारांची मुले आणि रस्त्यावरील कामगारांची मुले आरटीई कायद्यांतर्गत प्रवेशास पात्र आहेत.

आरटीई कायद्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया

आरटीई प्रवेशासाठी पालक ऑनलाइन प्रवेश घेऊ शकतात. हे कसे केले जाऊ शकते ते येथे आहे.

. जवळच्या भागातील शाळा शोधा

आरटीई कोटा अंतर्गत शाळांसाठी अर्ज करण्याची पहिली पायरी म्हणजे आपल्या जवळील भागातील पात्र शाळा शोधणे. आपण आपल्या राज्यातील शाळांबद्दल माहिती ऑनलाइन शोधू शकता. जर आपण कर्नाटकात असाल तर आपण हा दुवा तपासू शकता.

. ऑनलाईन फॉर्म भरा

कोटा वापरुन आपल्या मुलांना शाळेत प्रवेश घेण्यास इच्छुक पालकांनी शासकीय पोर्टलवर लॉग इन करुन प्रदान केलेला कागदपत्र भरावा. एकदा आपण फॉर्म भरला की तो प्रिंट करून घ्या.

. फॉर्म जमा करा

त्यानंतर आपण आपल्या आवडीच्या शाळेत संबंधित कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करू शकता. मुलास शासकीय शाळांमध्ये प्रवेशाची हमी असते. खासगी शाळांनी या कायद्यानुसार २५% विद्यार्थ्यांना स्वीकारले पाहिजे.

आरटीई अंतर्गत प्रवेशाविषयी काही अधिक माहिती येथे आहेः

  • नवोदय आणि राज्य शाळांमध्ये स्क्रिनिंग नाही

राज्य शिक्षण संस्था आणि नवोदय म्हणून ओळखल्या जाणार्‍या विशेष शाळांमध्ये मुलांसाठी स्क्रिनिंग नाही. खाजगी शाळा मुलांना प्रवेश देण्यापूर्वीच त्यांची स्क्रीनिंग करू शकतात परंतु लैंगिक, धर्म किंवा जातीवर आधारित मुलांमध्ये कोणताही भेदभाव होणार नाही याची खात्री करण्यासाठी शालेय मंडळाने निश्चित केलेल्या निकषांनुसार स्क्रीनिंग करणे आवश्यक आहे.

  • प्रवेश प्रक्रियेमध्ये गणवेशाचा समावेश

संबंधित फॉर्म भरल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर आपल्या मुलास शाळेचा गणवेश मिळेल. शाळा त्यासाठी शुल्क आकारू शकत नाहीत.

  • पुस्तके ह्या प्रक्रियेचा एक भाग आहेत

आपल्या मुलास दर्जेदार शिक्षणाचा अधिकार आहे. याचा अर्थ असा की प्रवेश प्रक्रियेदरम्यान शाळा प्रशासक आपल्याला संबंधित प्रक्रियेद्वारे मार्गदर्शन करतील ज्यात नोटबुक, पाठ्यपुस्तके आणि स्टेशनरी देणे समाविष्ट आहे. हे सर्व शाळांमध्ये विनामूल्य आहे आणि त्यासाठी शुल्क आकारले जाऊ नये.

  • नवोदय शाळांमध्ये प्रमाणपत्रे अनिवार्य नाहीत

वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील मुलांशी निष्ठा राखण्यासाठी, नवोदय शाळा आणि सरकारी शाळा प्रमाणपत्र न घेता मुलांना स्वीकारतात. जी मुले संबंधित रेकॉर्ड जमा करू शकत नाहीत किंवा ज्यांच्याकडे ही रेकॉर्ड्स कधीच नव्हती ते प्राथमिक शिक्षणासाठी पात्र आहेत. यासाठीची प्रक्रिया थोडी वेगळी आहे आणि त्यात नोंदणी अधिकाराच्या विवेकबुद्धीचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी स्थानिक सरकारी कार्यालयांशी संपर्क साधा.

  • परिसरानुसार अर्जाची संख्या ५ पर्यंत मर्यादित आहे

आरटीई कायद्याद्वारे अर्ज करणारे मुले आसपासच्या जास्तीत जास्त ५ शाळांमध्ये अर्ज करू शकतात. हे पालकांच्या पसंतीच्या क्रमाने असू शकते. अर्ज अयशस्वी झाल्यास, सरकार आपल्या मुलास आपल्या निवासस्थानाजवळ असलेल्या नियुक्त शाळेत ठेवू शकते किंवा आपल्या वतीने खासगी शाळांकडे अपील करू शकते.

परिसरानुसार अर्जाची संख्या ५ पर्यंत मर्यादित आहे

आरटीई प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

वर नमूद केल्याप्रमाणे अशी काही कागदपत्रे आहेत ज्यांना तुम्ही आरटीई प्रवेश फॉर्मसह जमा करणे आवश्यक आहे. याचा लाभ सरकारी पोर्टलवर घेता येतो. आवश्यक कागदपत्रे येथे आहेतः

  • पालकांचा सरकारी आयडी ड्रायव्हरचा परवाना, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, रेशनकार्ड, जन्म प्रमाणपत्रे आणि पासपोर्ट
  • मुलाचा आयडी पालकांनी मुलांचे जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट आणि आधार कार्ड ह्यांसह सर्व शासकीय कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  • जातीचे प्रमाणपत्र आरटीई प्रवेशासाठी जातीचे प्रमाणपत्र देखील महत्त्वाचे कागदपत्र आहे.
  • भारतीय महसूल विभागाकडून प्राप्तिकर प्रमाणपत्र.
  • मुलास विशेष गरजा असल्याचे सिद्ध करण्यासाठी संबंधित प्रमाणपत्रे. हे आपल्याला आरोग्य विभाग प्रदान करेल.
  • रस्त्यावरील मुलासाठी किंवा स्थलांतरित कामगारांचे मूल असल्यास, तसे कामगार विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभागाकडून दिले जाणारे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • मुलाची छायाचित्रे.
  • जर मुल अनाथ असेल तर दोन्ही पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र तयार केले जावे.
  • प्रवेशासाठी अंतिम मुदतीपूर्वी सर्व अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. आरटीई प्रवेशाची अंतिम तारीख साधारणपणे दरवर्षी एप्रिलच्या दुसर्‍या आणि शेवटच्या आठवड्यात असते.

वेगवेगळ्या राज्यातील आरटीई प्रवेश

कर्नाटक http://202.138.101.21/schregrte/RTE2015/rteinstructions2016.aspx
महाराष्ट्र https://www.govnokri.in/admission/rte-maharashtra-admission-2019-2020-apply-online/
अंदमान निकोबार http://righttoeducation.in/resources/states/andaman-and-nicobar-islands
आंध्रप्रदेश http://righttoeducation.in/resources/states/andhra-pradesh
अरुणाचल प्रदेश http://righttoeducation.in/resources/states/arunachal-pradesh
आसाम http://righttoeducation.in/resources/states/assam
बिहार http://righttoeducation.in/resources/states/bihar
चंदीगड http://righttoeducation.in/resources/states/chandigarh
छत्तीसगढ http://righttoeducation.in/resources/states/chhattisgarh
दिल्ली http://righttoeducation.in/resources/states/delhi
गोवा http://righttoeducation.in/resources/states/goa
गुजरात http://righttoeducation.in/resources/states/gujarat
हरियाणा http://righttoeducation.in/resources/states/haryana
हिमाचल प्रदेश http://righttoeducation.in/resources/states/himachal-pradesh
जम्मू आणि काश्मीर http://righttoeducation.in/resources/states/jammu-and-kashmir
झारखंड http://righttoeducation.in/resources/states/jharkhand
केरळ http://righttoeducation.in/resources/states/kerala
लक्षद्वीप http://righttoeducation.in/resources/states/lakshadweep
मध्यप्रदेश http://righttoeducation.in/resources/states/madhya-pradesh
मणिपूर http://righttoeducation.in/resources/states/manipur
मेघालय http://righttoeducation.in/resources/states/meghalaya
मिझोराम http://righttoeducation.in/resources/states/mizoram
नागालँड http://righttoeducation.in/resources/states/nagaland
ओरिसा http://righttoeducation.in/resources/states/orissa
पॉण्डेचारी http://righttoeducation.in/resources/states/puducherry
पंजाब http://righttoeducation.in/resources/states/punjab
राजस्थान http://righttoeducation.in/resources/states/rajasthan
सिक्कीम http://righttoeducation.in/resources/states/sikkim
तामिळनाडू http://righttoeducation.in/resources/states/tamil-nadu
त्रिपुरा http://righttoeducation.in/resources/states/tripura
उत्तरप्रदेश http://righttoeducation.in/resources/states/uttar-pradesh
उत्तराखंड http://righttoeducation.in/resources/states/uttarakhand
पश्चिम बंगाल http://righttoeducation.in/resources/states/west-bengal
दमण आणि दीव http://righttoeducation.in/resources/states/daman-and-diu
दादरा आणि नगर हवेली http://righttoeducation.in/resources/states/dadra-and-nagar-haveli

सामान्य प्रश्न

. आरटीई नवोदय शाळांना दिलासा कसा देईल?

नवोदय शाळांना आरटीई कायद्यातील तरतुदींमधून सूट देण्यात आली आहे. नवोदय शाळांमध्ये ७५% जागा ग्रामीण मुलांसाठी राखीव आहेत. ज्यांना कागदपत्रे देणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी कागदपत्रे निम्म्याने कमी करण्यात आलेली आहेत. बर्‍याच नवोदय शाळांमध्येही तपासणी न करता प्रवेश घेण्याची हमी दिली जाते. त्यांच्याकडे मुलींसाठी ३% आरक्षणे आहेत आणि एससी / एसटी मुलांसाठी जागा आरक्षित आहेत.

. अभ्यासक्रम जागेनुसार बदलतो का?

शिक्षण मंडळाच्या आधारे अभ्यासक्रम बदलू शकतो. हे केवळ आरटीई विद्यार्थ्यांसाठी नाही तर सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. सीबीएसई, आयसीएसई, राज्य आणि एनआयओएस बोर्डांचा अभ्यासक्रम वेगळा आहे. . याव्यतिरिक्त, आरटीईद्वारे विद्यार्थ्यांना स्वीकारणारे आयबी आणि आयजीसीएसई आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये देखील भिन्न अभ्यासक्रम असू शकतात. आणखी एक मुद्दा लक्षात घेण्याची बाब म्हणजे आपला मुलगा ज्या राज्यात शिक्षण घेत आहे त्या राज्य आधारे राज्य मंडळाचा अभ्यासक्रम बदलतो. याचा अर्थ असा होतो की कर्नाटकमधील एसएसएलसीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम तामिळनाडूमध्ये शिकणाऱ्यांपेक्षा वेगळा आहे.

. राज्य स्तरावर अभ्यासक्रम व मूल्यांकन प्रणाली विहित कोण करते?

राज्य शिक्षण मंडळ विविध राज्यांसाठी अभ्यासक्रम आणि मूल्यांकन संबंधित प्रक्रियेचे प्रभारी आहे. राज्य शिक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंडळासह शिक्षकांचे एक पॅनेल अभ्यासक्रम तयार करतात आणि एसएसएलसी बोर्ड राज्यातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करते.

. बोर्डाच्या परीक्षा नसल्यास मूलभूत शिक्षण पूर्ण केल्याबद्दल मुलाचे प्रमाणपत्र कसे असेल?

शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवतात आणि जेव्हा विद्यार्थी आवश्यक शैक्षणिक गोष्टी पूर्ण करतात तेव्हा ते त्यांना प्रमाणपत्र देतात. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन वाजवी माध्यमातून केले जाते. जे विद्यार्थी सरासरी परफॉर्मर्स आहेत त्यांना शिक्षकांनी इतर विद्यार्थ्यांच्या पातळीवर आणले आहे. या प्रकारचे शिक्षण परीक्षांची गरज दूर करते.

. हे खरे आहे का की कोणत्याही मुलाला शाळेतून काढून टाकले जाऊ शकत नाही किंवा अयशस्वी केले जाऊ शकत नाही?

शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यानुसार आरटीई अंतर्गत मुले आणि ८ वी पर्यंतच्या सर्व मुलांना पालकांच्या संमतीशिवाय त्याच वर्गात ठेवता येणार नाही. जर पालक सहमत नसतील तर मुलाला परत त्याच वर्गात ठेवता येईल, परंतु हे कधीही अपयशी ठरत नाही. हे देखील खरे आहे की कोणत्याही मुलाला शाळेतून काढून टाकले जाऊ शकत नाही.

. जर एखादे १३ वर्षांचे मूल एखाद्या शाळेत जाऊ इच्छित असेल तर जेव्हा तो १४ वर्षांचा होईल तेव्हा त्याला एका वर्षात शाळा सोडण्यास सांगितले जाईल का?

हे प्रकरण पूर्णपणे मुलावर अवलंबून आहे. सिद्धांतानुसार, मुलाने सर्व शैक्षणिक बाबी पूर्ण करून तो १४ वर्षांचा झाल्यावर त्यास शाळा सोडण्यास सांगितले जाऊ शकते. तसे नसल्यास, शाळेने हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की तो विद्यार्थी प्रमाणपत्र देण्यापूर्वी त्याच्या तोलामोलाच्या पातळीवर आहे.

. हा कायदा केवळ दुर्बल घटकांसाठी आहे का?

आरटीई कायदा हा समाजातील कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी नाही. ज्याकडे स्त्रोत मर्यादित असतात किंवा नसतात त्यांना शिक्षण प्रदान करण्याचे उद्दीष्ट आहे. यात समृद्ध नसलेल्या सोसायटीच्या सदस्यांचा समावेश आहे. सर्व मुलांना शिक्षणाची हमी देणे हे त्याचे उद्दीष्ट आहे. याचा अर्थ असा की वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील मुलांना अभ्यासाची संधी मिळेल.

आरटीई कायदा हे सुनिश्चित करतो की मुलांना अभ्यास करण्याची आणि त्यांना सक्षम बनविण्याची संधी मिळेल. आरटीईची निवड करण्यासाठी राज्यस्तरावर शिक्षण विभागाशी संपर्क साधा. या कायद्याद्वारे आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

आणखी वाचा:

पालकांना माहिती असाव्यात अशा शासनाच्या शालेय शिक्षण योजना
भारतातील विविध शिक्षण मंडळे – सीबीएससी, आयसीएससी, आय.बी. आणि राज्य शिक्षण मंडळ

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article