Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) काळजी विस्कळीत कुटुंब – वैशिष्ट्ये आणि परिणाम

विस्कळीत कुटुंब – वैशिष्ट्ये आणि परिणाम

विस्कळीत कुटुंब – वैशिष्ट्ये आणि परिणाम

प्रत्येक व्यक्ती एका कुटुंबात वाढते, ज्या कुटुंबाची स्वतःची एक संस्कृती असते. मुलांच्या आयुष्यातली वाढीची सुरुवातीची काही वर्षे, आणि ज्या वातावरणात मुले वाढतात, त्याचा मुलांवर थेट परिणाम होतो आणि पुढे जाऊन एक व्यक्ती म्हणून ही मुले समाजात कशी कार्यरत होतात, हे सुद्धा त्यावर अवलंबून असते.

विस्कळीत कुटुंब म्हणजे नक्की काय?

ज्या कुटुंबामध्ये सतत भांडणे, निष्काळजीपणा आणि वाईट वर्तणूक असते अशा कुटुंबाना विस्कळीत कुटुंब म्हणतात. कुटुंबांमध्ये भावनिक पातळीवर भरपूर प्रमाणात उलथापालथ असते. मुलांकडे दुर्लक्ष तसेच त्यांच्याशी गैरवर्तन सुद्धा पाहायला मिळते. विस्कळीत कुटुंबातील मुलांना असे वाटते सगळयांच्याकडे असेच असते. आणि त्यामुळे त्यांना ह्या विस्कळीत कुटुंबातील वेगवेगळ्या प्रश्नांना कसे सामोरे जावे कळत नाही.

ह्याउलट सुदृढ कुटुंबांमध्ये, कुटुंबातील सगळ्या सदस्यांना त्यांचा विकास होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. आणि भावनिकदृष्या सक्षम आणि सुरक्षित होण्यासाठी मदत केली जाते.

विस्कळीत कुटुंबातील सदस्यांमधील एकमेकांशी नातं

विस्कळीत कुटुंबांमध्ये कायम उदासीनता असते, तिथे काही प्रमाणात मुलांकडे दुर्लक्ष आणि वाईट वर्तणूक असते. अशा कुटुंबांमध्ये वाढलेल्या मुलांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मप्रशंसेचा अभाव असतो. सर्वांच्या घरी असेच वातावरण असते असे ह्या मुलांना वाटते. मुलांच्या वाढीवर आणि विकासावर ह्याचा परिणाम होतो.

ह्याउलट सुदृढ कुटुंबांमध्ये, घरातील सदस्यांमध्ये एकमेकांविषयी आदर असतो. विस्कळीत कुटुंबांमध्ये मुलं आणि पालकांमध्ये ताण आणि अविश्वास असतो. तसेच मोठ्या माणसांमध्ये सुद्धा अविश्वास आणि रुसवेफुगवे असतात. अशा घरातील सदस्य मुलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करत नाहीत. मुले अशा घरात वाढताना सतत अनामिक भीती बाळगून असतात. अशा कुटुंबांमध्ये क्षमेला किंमत नसते आणि भावनांना मोकळेपणाने व्यक्त करता येत नाही.

विस्कळीत कुटुंब असण्याची कारणे

कुठलंच कुटुंब अगदी सर्वतऱ्हेने योग्य नसते. तसेच आपला जन्म कुठल्या कुटुंबात व्हावा हे सुद्धा आपल्या हातात नसते. विस्कळीत असण्यामागे खूप कारणे आहेत. विस्कळीत कुटुंब असण्याची काही वैशिष्ट्ये खाली देत आहोत.

१. आर्थिक कारण

जर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची असेल तर त्याचा परिणाम म्हणून कुटुंब विस्कळीत बनू शकते. कुटुंबात काही प्रश्न निर्माण झाले तर पालक चिंताग्रस्त होतात. त्यामुळे मग कुटुंबातील सदस्यांमध्ये दरी निर्माण होते आणि त्यामुळे भांडणे होतात आणि घराची शांतता आणि पावित्र्य नाहीसे होते.

आर्थिक कारण

२. कुटुंब विस्कळीत असण्याचा इतिहास असणे

जर एखाद्या कुटुंबामध्ये पिढ्यानपिढ्या निष्क्रियता असेल तर हे चक्र थांबत नाही. कुटूंबातील सगळ्या सदस्यांचे गुण विस्कळीत कुटुंब असण्यासाठी कारणीभूत असतात.

३. हिंसा

कुटुंबातील आधीच्या पिढीमध्ये शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अत्याचार करण्याचा इतिहास असेल तर त्यामुळे पालकांमध्ये मुलांविषयी भीती आणि हिंसेची भावना निर्माण होते.

४. अती धार्मिक असणे

जर एखाद्या कुटुंबामध्ये अतिधार्मिक वातावरण असेल आणि संवाद, वादविवाद आणि स्पष्टीकरण यासाठी वेळ नसेल तर मुलांमध्ये सुद्धा हे सगळं रुजवलं जाते. पालक काही कारण नसताना मुलांशी अगदी शिस्तीत वागतात आणि त्यामुळे एकूणच कुटुंबामध्ये विस्कळीतपणा येतो.

५. अधिकार

विस्कळीत कुटूंब असण्यामागे अजून एक कारण म्हणजे पालक मुलांशी सतत अधिकारवाणीने बोलतात तसेच त्यांना धाकात ठेवतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांविषयी अधिकार निर्माण होतो आणि नावड निर्माण होते.

अधिकार

तुम्ही विस्कळीत कुटुंबामध्ये मोठे झाला आहेत का याबद्दलची काही लक्षणे

खरंतर तुम्ही विस्कळीत कुटुंबातून आला आहात किंवा कसे हे सांगणे खूप कठीण आहे, पण खाली काही लक्षणे दिली आहेत त्यानुसार तुम्ही तपासून पाहू शकता.

१. तुम्ही लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करता

जर लोकांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत असाल तर ते तुम्ही विस्कळीत कुटुंबातील आहेत ह्याचे लक्षण आहे. जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक गरजांचा त्याग करून दुसऱ्यांना आनंदी ठेवत असाल तर ते ह्याच लक्षण आहे.

२. तुम्ही “A Type ” ह्या प्रकारात मोडणाऱ्या व्यक्ती आहात.

जर तुम्ही कायम प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण राहण्याचा प्रयत्न करीत असाल तर, तुम्हाला अपयशाचे भय वाटते. हे तुम्ही विस्कळीत कुटुंबात वाढत असल्याचे लक्षण आहे.

३. आपण सतत स्वतःला दोषी मानता का?

जर तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या वागणुकीमुळे, जे की तुमच्या अधिपत्याखाली नाही त्याला दोषी मानता का? लोक तुमच्यामुळे दुःखी झाले नसले तरीही तुम्ही स्वतःला दोषी समजता का?

४. तुमच्याकडे संवादकौशल्य कमी पडतात का?

जर तुमच्याकडे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत भावना व्यक्त करण्याचे निरोगी कौशल्य नसेल तर तुम्ही शांत बसता आणि व्यक्त होत नाही. तर तुम्ही विस्कळीत कुंटुबातील असण्याची शक्यता जास्त आहे.

५. दुसऱ्यांसाठी स्वतःला जबाबदार धरता

दुसऱ्यांनी स्वतः घेतलेल्या निर्णयामुळे बिकट परिस्थिती उद्भवल्यास तुम्ही स्वतःला जबाबदार धरत असल्यास

६. स्वतःच्या बाबतीत तुम्ही खूप कठोर आहात

तुम्ही स्वतः कुठलीही छोटी गोष्ट केली किंवा मोठं यश मिळवलं तरी तुम्ही स्वतःवर तीव्र टीका करता. काहीही चुकीचं झालं तरी तुम्ही तो स्वतःचा दोष धरता. तुम्ही स्वतःबाबत खूप कठोर होता.

७. तुम्ही खूप चिंता करता

जरी सगळं सुरळीत चालू असेल तरी तुम्ही सतत चिंता करत राहता. त्यामुळे चिंता खूप वाढते. परिणामी तुम्ही स्वतः आनंदी राहू शकत नाही.

८. तुम्हाला एकटं आणि रिकामं वाटतं

सारखं एकटं राहिल्याने आणि भावनिक आधार न मिळाल्यामुळे तुम्हाला अपूर्ण आणि रिकामे वाटते. तुम्हाला सतत तुमच्याकडे लक्ष असावे असे वाटते आणि मग तुम्हाला एकटं वाटतं.

तुम्हाला एकटं आणि रिकामं वाटतं

९. निराश वाटणे

आयुष्य कसंही असलं तरी तुम्ही काय चुकत आहे हे सांगू शकता आणि तुम्ही असमाधानी राहता. तुम्हाला असे वाटत राहतं की तुम्हाला यश मिळत नाही.

१०. तुम्हाला मत्सर वाटू शकतो

तुमच्या दैनंदिन आयुष्यात काहीही कारण नसताना तुम्हाला दुःखी आणि निराशावादी वाटू शकते. त्यामुळे तुमच्यात नकारात्मक विचार असतील तर आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघा.

विस्कळीत कुटुंबाची वैशिष्ट्ये

विस्कळीत कुटुंबातील खूप गुणधर्मांमुळे कुटुंबातील कुटुंबातील सदस्य एकमेकांशी अनोळखी असल्याप्रमाणे वागतात. तसेच त्यांची एकमेकांप्रती वृत्ती सुद्धा तशीच असते

विस्कळीत कुटुंबाची काही सामान्य लक्षणे आहेत.

१. संवादाचा आभाव

विस्कळीत कुटुंबातील सदस्यांना एकमेकांशी मोकळा संवाद कसा साधावा हे कळत नाही आणि तसेच अशा कुटुंबांमध्ये संवादाविषयी प्रश्न सुद्धा असू शकतात. काही प्रश्न असतील तर मोकळेपणाने चर्चा न करता ते दडपून ठेवले जातात. ते संवादासाठी सुदृढ वातावरण तयार करू शकत नाहीत. संवाद साधताना एकमेकांवर आरडाओरडा आणि भांडणे होतात. कुटुंबातील सदस्य एकमेकांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात.

२. सहानुभूतीचा अभाव

विस्कळीत कुटुंबामध्ये सहानुभूती नसते किंवा कमी प्रमाणात असते. ह्याचे प्रमाण इतके जास्त असते की मुलांना स्वतःविषयी वाईट वाटते. तिथे नितळ प्रेमाचा अभाव असतो. आणि फक्त वर्तणुकीवर लक्ष ठेऊन छोट्या छोट्या चुकासुद्धा मुलांना लगेच सुधारण्याचा सल्ला दिला जातो. चुका करण्यास कुठलीही मुभा नसते आणि त्यामुळे भीतीदायक वातावरण कायम असते आणि त्यामुळे मुलांमध्ये अयशस्वी होण्याची भीती वाटत राहते.

३. व्यसनास प्रवृत

आपल्या पालकांना धूम्रपान करताना पाहताना पाहणे, किंवा दारू पिताना पाहिलेली मुले जेव्हा मोठी होतात तेव्हा ते सुद्धा आयुष्याशी सामना करताना अशा पदार्थांच्या आहारी जातात.

व्यसनास प्रवृत

४. मानसिक त्रास

घरातील मोठ्या लोकांना जर काही मानसिक त्रास असेल किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वात काही उणिवा असतील तर त्यांच्यासोबत कसे वागावे हे मुलांना कळत नाही.

५. वागणूकीवर बंधन

काहीवेळा पालक मुलांच्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवतात, त्यामुळे त्यांची विकासाची क्षमता कमी होते. अशा नियंत्रणामुळे मुले स्वतःबद्दल साशंक होतात आणि स्वतःवर विश्वास ठेवणे कठीण होते.

६. अचूकता

पालक नेहमी मुलांना चांगल्या प्रगतीसाठी दबाव आणतात

७. टीका

विस्कळीत कुटुंबात मुलांवर त्यांच्या क्षमतांमुळे कायम टीका केली जाते. आणि त्यांच्या प्रत्येक कृतीसाठी कान धरला जातो. पालकांचे नेहमीच अचूक असणे आणि मुलांच्या बाबतीत संरक्षक असणे, मुलांवर अविश्वास दाखवणे ह्यामुळे मुलांची स्वप्रतिष्ठा कमी होते.

टीका

८. स्वातंत्र्य आणि गोपनीयतेची कमतरता

पालक कायम मुलांच्या आयुष्यात डोकावू पाहतात आणि त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याबाबत कुठलेच स्वातंत्र्य मिळत नाही. प्रत्येक वेळी मुले काय करत आहेत ह्याकडे लक्ष ठेवले जाते आणि मुलासोबत कधीच प्रामाणिक संवाद साधला जात नाही.

९. भावनिक आधाराची कमतरता

विस्कळीत कुटुंबामध्ये भावनांचा विचार केला जात नाही किंवा भावनिक आधार दिला जात नाही. मुलांना मोकळेपणाने बोलता येत नाही तसेच त्यांचे म्हणणे सकारात्मकतेने ऐकेल असा कुणीही नसते. मुले कायम एकटी एकटी राहतात किंवा पालकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात.

१०. हिंसा आणि गैरवर्तन

विस्कळीत कुटुंबातील पालक आपल्या कुटुंबातील मुलांशी गैरवर्तन करून मुलांना इजा पोहोचवू शकतात. अशा कुटुंबांमध्ये मुले शाब्दिक, शारीरिक, लैंगिक आणि भावनिक गैरवर्तन पाहतात आणि ते सामान्य आहे असे त्यांना वाटते आणि पुढे मोठे झाल्यावर ही मुले अशीच वागतात.

विस्कळीत कुटुंबात वाढल्याचे परिणाम

विस्कळीत कुटुंबात वाढलेल्या मुलांवर नकारात्मक परिणाम होतात. अविश्वास, चिंता, तिरस्कार आणि अन्य नकारात्मक भावनांमुळे मुले पुढे मोठी झाल्यावर असुरक्षित बनतात.

असे दिसून आले आहे की विस्कळीत कुटुंबात वाढलेल्या मुलांची वागणूक एका विशिष्ट पद्धतीची असते.

१. त्यांची स्वप्रतिमा चांगली नसते आणि त्यांच्याकडे आत्मविश्वासाचा आणि स्वप्रशंसेचा आभाव असतो.
२. त्यांना सुदृढ नातेसंबंध तयार करताना कठीण जाते. तसेच ते लाजाळू असतात आणि व्यक्तिमत्वात त्रुटी असतात.
३. त्यांना वरचेवर राग येतो आणि ते एकटं राहण्यास प्राधान्य देतात.
४. अभ्यासात त्यांची कामगिरी चांगली नसते आणि त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास त्रास होतो.
५. स्वतःला इजा पोहचवू शकतात.
६. दारू,सिगारेट,आणि धूम्रपान प्रवण असतात.
७. त्यांना गंभीर मानसिक आजार होण्याची शक्यता असते उदा:उदासीनता,चिंता वगैरे
८. अशा लोकांना कुठलीही शिस्त नसते,कारण त्यांना चांगला “रोल मॉडेल ” नसतो, ज्यांच्याकडे बघून त्यांची चांगली वाढ होऊ शकेल. ते हिंसक बनू शकतात.
९. त्यांचा निरागसपणा लवकर नाहीसा होऊ शकतो कारण त्यांना लहान वयात मोठ्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात.

विस्कळीत कुटुंबामुळे होणारे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी काही टिप्स

जेव्हा तुमच्या लक्षात येते की तुम्ही अविकसित कुटुंबात वाढलेले आहात, तेव्हा सर्वात आधी ते स्वीकार आणि त्यासंबंधित काही सवयी किंवा वर्तणूक असेल तर ती मान्य करा. तुम्ही अविकसित कुटुंबात वाढलेले असल्याने त्याचे परिणाम सुद्धा तुमच्यावर होतात. पण त्याचाशी कसा सामना करायचा ह्याचे काही मार्ग आहे, कसं ते पहा

१. जबाबदारी घ्या

एक प्रौढ ह्या नात्याने तुम्हाला तुमच्या परिस्थितीवर मात करून, भावनिकरीत्या सुदृढ परिस्थिती कशी निर्माण होईल ह्यावर काम केले पाहिजे. स्वतःच्या कृतींची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे तसेच तुमच्या स्वतःच्या स्वतःकडून आणि कुटुंबाकडून काय अपेक्षा आहेत हे शिकले पाहिजे.

२. मदत घ्या

जेव्हा कमतरता तुमच्या लक्षात येतात, तेव्हा तुम्ही तज्ञांची मदत घेतली पाहिजे. आणि लहानपणाचे काही प्रश्न कसे हाताळावेत ह्याचीसुद्धा मदत घेतली पाहिजे. स्वप्रशंसा हाताळणे खरं तर अवघड आहे परंतु मित्रमैत्रिणी आणि कुटुंबाची मदत नक्कीच घेऊ शकता.

३. सर्जनशील व्हा

तुम्हाला विस्कळीत कुटुंबामुळे आलेला नकारात्मक परिणाम घालवायचा असेल योग्य मार्गाने तुमच्या कुटुंबातील सदस्यांजवळ आणि जवळच्या मित्र मैत्रिणींजवळ व्यक्त व्हा. विचारांची देवाणघेवाण करा आणि तुमचं नातं कसं वाचवता येईल ते पहा.

४. विश्वास संपादन करा

जिथे विश्वास नाही अशा वातावरणात राहणे हे सोपे नाही. तुम्ही लहान असताना अविश्वासपात्र पालकांना पाहिल्यामुळे तुमच्या प्रौढावस्थेत तुम्हालाही तशीच सवय लागते. थोडं धैर्य आणि प्रयत्नांनी तुम्ही तुमच्या जवळच्यांमध्ये विश्वास संपादन करू शकता.

विश्वास संपादन करा

५. तुमच्या कुटुंबात बंध निर्माण करा

ज्या विस्कळीत कुटुंबामध्ये भावनिक अस्थिरता असते तिथे तुम्ही हे तुटलेले नातेसंबंध नव्याने जुळवू शकता. छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा. माफ करायला शिका आणि तुमच्या कुटुंबाला शक्य तितकी मदत करा.

तुम्ही लहानाचे मोठे कसेही झाला असलात तरीही तुम्हाला स्वतःला सुधारण्याची नेहमीच संधी असते त्यामुळे तुम्हाला तुमच्या जवळच्यांशी नक्कीच अर्थपूर्ण नातं निर्माण करता येईल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article