आहार आणि पोषण

गरोदरपणात भूक न लागणे: कारणे आणि उपाय

लोकप्रिय माध्यमांमध्ये दाखवलेले गरोदरपणाचे चित्रण, कधीकधी वास्तविक जीवनातील मातृत्वाशी संबंधित अनेक गुंतागुंत कमी करते. असेच एक उदाहरण म्हणजे इतर सामान्य माणसांपेक्षा गरोदर स्त्रीला खूप भूक लागते असे चित्रण बरेचदा केले जाते. पिझ्झापासून कच्च्या लोणच्यापर्यंत सर्वकाही अगदी अधाशीपणे खाणाऱ्या ह्या गर्भवती स्त्रियांना बघितल्यावर खऱ्या जगातील गरोदर स्त्रियांना धक्का बसू शकतो.

संपूर्ण आयुष्यात गरोदरपणाचा काळ म्हणजे हवे ते, हवे तेवढे खाता येते असा विचार बरेच लोक करतात. परंतु ह्याच काळात स्त्रियांना त्यांचे आवडते पदार्थ नुसते बघून किंवा त्याच्या वासाने मळमळ होऊ शकते.

पहिल्या तिमाहीत भूक कमी होणे

पहिल्या तिमाहीत तुमच्या शरीरात बाह्य स्वरुपात कोणतेही बदल होऊ शकत नसले तरी, बाळाच्या वाढीची सुरुवात तुमच्या पोटात होत असते. हार्मोनल बदल होत असतात आणि ते थेट आईच्या मॉर्निंग सिकनेसला कारणीभूत ठरतात. पहिल्या तिमाहीत, दर आठवड्याला सुमारे एक पौंड इतकी वजनवाढ अपेक्षित असते आणि गर्भाच्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते पुरेसे असते.

भूक कमी होण्याचे कारण काय आहे?

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात, मॉर्निंग सिकनेसची सुरुवात झाल्यावर भूक लागत नाही. सिनेमा आणि नाटकात दाखवतात त्याच्या अगदी विरुद्ध स्थिती प्रत्यक्षात आढळते. ७० ते ८५% गर्भवती स्त्रियांना भूक लागत नाही.

आईने खाल्लेल्या कोणत्याही हानिकारक अन्नपदार्थांपासून गर्भाचे संरक्षण करण्याची 'मॉर्निंग सिकनेस' म्हणजे एक सहज पद्धत आहे. पहिल्या तिमाहीमध्ये गर्भवती आईची भूक कमी होण्याचे हे कारण आहे. इस्ट्रोजेन आणि एचसीजी ह्या संप्रेरकांची पातळी गर्भवती स्त्रीच्या शरीरात वाढते आणि त्यामुळे सुद्धा भूक मंदावते. ह्या सर्व बदलांमुळे गर्भवती स्त्री तिच्या सभोवतालच्या वासांबद्दल अधिक संवेदनशील होते आणि तिला मळमळते. काही स्त्रियांमध्ये ह्या बदलांमुळे चव जाते तसेच जिभेला धातूची चव येते आणि त्यामुळे तिला तिच्या आवडत्या अन्नपदार्थांबद्दल तिटकारा वाटू लागतो.

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात भूक मंदावल्याने गरोदरपणात तुमच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करण्याचे उपाय

भूक न लागणे, काही बाबतीत फायदेशीर असताना, आई तिच्या पोषण गरजांकडे दुर्लक्ष करू शकते. यावर उपाय करणे आवश्यक आहे, आणि त्यावरील उपाय पुढीलप्रमाणे

दुसऱ्या तिमाहीत भूक न लागणे

दुसरी तिमाही, पहिल्या तिमाही इतकी वाईट नसते कारण बहुतेक स्त्रियांना ह्या काळात पुन्हा भूक लागण्यास सुरुवात होते. हा काळ गरोदरपणातील सर्वोत्तम असा काळ मानला जातो कारण पुन्हा भूक लागायला सुरुवात होते, त्वचा चमकदार दिसू लागते तसेच पोटसुद्धा अद्याप दिसायला सुरुवात झालेली नसते. परंतु काही वेळा हे इतके सुरळीत असत नाही कारण अपचनाचा त्रास होऊन अनेक वेळा शौचास जावे लागू शकते.

भूक न लागण्याचे कारण काय?

गरोदरपणातील दुसरी तिमाही महत्वाची मानली जाते कारण ह्या कालावधीत गर्भाचा खूप विकास होतो, म्हणूनच गर्भाच्या आरोग्यासाठी पुरेसे पोषण आवश्यक आहे. ह्याच काळात मुलाच्या आरोग्याचा विचार करून तुम्हाला दोन वेळा खावे लागते. गर्भवती आईला भूक न लागणे चांगले नाही कारण त्याचा बाळाच्या विकासावर थेट परिणाम होऊ शकतो.

पचनाची प्रक्रिया मंद झाल्यामुळे ह्या कालावधीत भूक कमी लागते. गर्भाशयाचा आकार वाढत असल्यामुळे त्याचा दाब पोट आणि पचनसंस्थेवर पडतो आणि त्यामुळे बद्धकोष्ठता वाढून भूक मंदावते. आईच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉनची पातळी सुद्धा ह्या काळात मंदावते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता वाढते आणि भूक लागत नाही.

गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत भूक मंदावणे - उपाय

तिसऱ्या तिमाहीत भूक कमी होणे

तिसऱ्या तिमाहीपर्यंत, तुमच्या पोटाचा आकार वाढलेला असतो आणि भूकही लागते . अशा तऱ्हेने तिसऱ्या तिमाहीमध्ये तुम्ही एक परिपूर्ण गर्भवती स्त्री असता . परंतु ह्याचा अर्थ असा नाही कि तुम्ही वाटेल ते खाऊ शकता. कारण तुमची भूक लक्षणीयरीत्या कमी झालेली असते. तिसऱ्या तिमाहीतील एक चांगली गोष्ट म्हणजे ह्या काळात मळमळ पूर्णपणे थांबलेली असते आणि पोटाचा आकार वाढलेला असतो.

भूक न लागण्याचे कारण काय?

गरोदरपणाच्या ह्या कालावधीत तुमच्या पोटाचा आकार वाढलेला असतो त्यामुळे भूक कमी होते. ह्या काळात गर्भाशय मोठे झालेले असते आणि जवळच्या अवयवांना कार्य करण्यासाठी खूप कमी जागा असते. पोट आणि लहान आतडे यांसारखे अवयव त्यांच्या नेहमीच्या जागेच्या बाहेर ढकलले जातात आणि त्यामुळे ते सामान्यपणे कार्य करत नाहीत.

छातीत जळजळ होणे हा ह्याचा आणखी एक दुष्परिणाम आहे. त्यामुळे मसालेदार किंवा लिंबूवर्गीय पदार्थांविषयी तिरस्कार वाटू लागतो. प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढलेली असल्यामुळे आईला बध्दकोष्ठता होते आणि भूक कमी होते. ह्या सर्व कारणांमुळे आईला तिच्या आवडीचे पदार्थ तिसऱ्या तिमाही मध्ये खाता येत नाहीत.

तिसऱ्या तिमाहीमध्ये भूक मंदावणे - उपाय

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात भूक न लागणे हे खूप सामान्य आहे. ही भावना गरोदरपणात कोणत्याही वेळी उद्भवू शकते आणि सहसा गर्भधारणा झाल्यावर चार आठवड्यांनंतर भूक मंदावते. पूर्वी आवडणाऱ्या पदार्थांचा आता तिटकारा वाटू लागतो. स्त्रीच्या शरीरात होणाऱ्या बऱ्याच संप्रेरकांमधील बदलांमुळे असे होते. तुमच्या शरीराचे ऐका आणि भुकेच्या लक्षणांकडे लक्ष द्या. तुमच्या गरोदरपणाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला आवश्यक असलेले सर्व पोषण नक्कीच मिळेल.

आणखी वाचा:

गरोदरपणात तुम्ही टाळले पाहिजेत असे १० भारतीय अन्नपदार्थ

निरोगी बाळासाठी गर्भधारणेदरम्यान खाल्ले पाहिजेत असे १५ अन्नपदार्थ

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved